शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं रे…खत खरेदीसाठी सरकारचा थेट आदेश, पेरणीआधीच क्रांतीकारी निर्णय!
एकीकडे शेतीच्या पूर्वपेरणीच्या कामाला वेग आलेला आहे. तर दुसरीकडे मान्सूनपूर्व पावसानेही राज्यात अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. शेतकरी यंदा पेरणीच्या तयारीला लागला असला तरी इराणच्या युद्धामुळे शेतकऱ्याला खताची टंचाई निर्माण होण्याची भीती आहे.

छत्रपती संभाजीनगर : जसा जसा मान्सू जवळ यायला लागला आहे, तसे तसे राज्यात शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. शेतकरी आता शेतीची मशागत करणे, पेरणीसाठी बियाणे खरेदी करणे अशा कामात गुंतले आहेत.

एकीकडे शेतीच्या पूर्वपेरणीच्या कामाला वेग आलेला आहे. तर दुसरीकडे मान्सूनपूर्व पावसानेही राज्यात अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. शेतकरी यंदा पेरणीच्या तयारीला लागला असला तरी इराणच्या युद्धामुळे शेतकऱ्याला खताची टंचाई निर्माण होण्याची भीती आहे.

हीच भीती लक्षात घेता आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अधिकक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांनी दिलेल्या माहितीनुसार आता शेतकऱ्याला घरबसल्या मोबाईलवर खताची बुकिंग करता येणार आहे.

राज्य शासनाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यात खत बुकिंगसाठी पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. लवकरच शेतकऱ्यांसाठी खताच्या बुकिंगसाठी एक अॅप्लिकेशन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

सध्या हा प्रयोग दोन जिल्ह्यात राबवला जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तो राज्यभरात राबवला जाणार जाईल. म्हणजेच शेतकऱ्यांना लवकरच घरबसल्या खताचे बुकिंग करता येणार आहे. शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळण्यास मदत होणार आहे.