

पालक, मेथी आणि इतर पालेभाज्यांमध्ये फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते. यामुळे दररोजच्या आहारात कोणत्याही परिस्थितीमध्ये पालेभाज्या असणे आवश्यक आहे.

फक्त पालेभाज्याच नाही तर पालेभाज्यांसोबतच जवस, सूर्यफुलाच्या बिया आणि भोपळ्याच्या बियांचाही आहारात समावेश करायला हवा.

शिवाय गव्हाच्या चपातीऐवजी आपण दररोजच्या आहारात मिक्स पीठाची भाकरी खाल्ली पाहिजे, ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या या दूर होण्यास मदत होते.

जर तुम्हाला जवस, सूर्यफुलाच्या बिया तशा खाल्ला जात नसतील तर अशावेळी आपण मिक्स पीठामध्येही त्याचा समावेश करू शकता, ज्यामुळे त्याचे पोषण शरीराला मिळेल.