GK : 3 समुद्रांचा वेढा असलेले भारतातील एकमेव शहर कोणते?

Kanyakumari : कन्याकुमारी हे भारताच्या दक्षिण टोकावर असलेले एक ऐतिहासिक आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर आहे. हे शहर तीन समुद्रांनी वेढलेले आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Updated on: Dec 01, 2025 | 11:10 PM
1 / 5
भौगोलिक स्थान : कन्याकुमारी हे भारतीय द्वीपकल्पाचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. या ठिकाणी बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर हे तीन समुद्र एकत्र येतात.

भौगोलिक स्थान : कन्याकुमारी हे भारतीय द्वीपकल्पाचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. या ठिकाणी बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर हे तीन समुद्र एकत्र येतात.

2 / 5
त्रिवेणी संगम : या शहरात तीन समुद्र एकत्र येतात, त्यामुळे ठिकाणी होणाऱ्या त्यांच्या संगमाला धार्मिकदृष्ट्या 'त्रिवेणी संगम' मानले जाते आणि त्याला मोठे महत्त्व आहे.

त्रिवेणी संगम : या शहरात तीन समुद्र एकत्र येतात, त्यामुळे ठिकाणी होणाऱ्या त्यांच्या संगमाला धार्मिकदृष्ट्या 'त्रिवेणी संगम' मानले जाते आणि त्याला मोठे महत्त्व आहे.

3 / 5
विविध रंगांचे पाणी : येथे तीन समुद्रांचे पाणी वेगळ्या रंगाचे दिसते, विशेषतः पौर्णिमेच्या दिवशी किंवा विशिष्ट ऋतूमध्ये फरक जाणवतो. हे वेगवेगळ्या समुद्रातील मातीचा प्रकार, खोली आणि शेवाळ यामुळे दिलते.

विविध रंगांचे पाणी : येथे तीन समुद्रांचे पाणी वेगळ्या रंगाचे दिसते, विशेषतः पौर्णिमेच्या दिवशी किंवा विशिष्ट ऋतूमध्ये फरक जाणवतो. हे वेगवेगळ्या समुद्रातील मातीचा प्रकार, खोली आणि शेवाळ यामुळे दिलते.

4 / 5
सूर्योदय आणि सूर्यास्त : कन्याकुमारीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे एकाच ठिकाणाहून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहता येतो. हे फक्त तीन समुद्रांच्या संगमाच्या विशिष्ट स्थितीमुळे शक्य होते.

सूर्योदय आणि सूर्यास्त : कन्याकुमारीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे एकाच ठिकाणाहून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहता येतो. हे फक्त तीन समुद्रांच्या संगमाच्या विशिष्ट स्थितीमुळे शक्य होते.

5 / 5
स्वामी विवेकानंदांचे स्मारक : किनारी भागापासून थोड्या अंतरावर समुद्रात स्वामी  विवेकानंद रॉक मेमोरियल आहे. स्वामी विवेकानंदांनी याच खडकावर ध्यानधारणा केली होती, असे मानले जाते.

स्वामी विवेकानंदांचे स्मारक : किनारी भागापासून थोड्या अंतरावर समुद्रात स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल आहे. स्वामी विवेकानंदांनी याच खडकावर ध्यानधारणा केली होती, असे मानले जाते.