
गुरु ५ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ३:३८ वाजता मिथुन राशीत प्रवेश करतील. मिथुन राशीत राहताना ११ मार्च २०२६ रोजी ते मार्गी होतील. नंतर २ जून २०२६ रोजी कर्क राशीत गोचर करतील. गुरुच्या चालीत आणि राशी बदलल्याने राशींवर शुभ-अशुभ परिणाम होतील. विशेषतः ३ राशींसाठी हा काळ खडतर ठरेल. करिअर आणि आर्थिक बाबींमध्ये आव्हाने येतील. याचा कोणत्या राशींवर परिणाम होणार जाणून घ्या.

मीन राशी: देवगुरु बृहस्पती हे मीन राशीचे स्वामी ग्रह आहेत. गुरुचा गोचर आणि वक्री अवस्था मीन राशीच्या जातकांना थोडे त्रासदायक ठरू शकते. संततीच्या बाजूने चिंता होऊ शकते. नवीन काम सुरू करणे टाळा, सध्याचा काळ त्यासाठी अनुकूल नाही. आर्थिक अडचणी टाळण्यासाठी खर्चावर नियंत्रण ठेवा.

वृश्चिक राशी: आर्थिक बाबतीत अतिशय सावध राहावे लागेल. जास्त खर्च केला तर कर्ज घ्यावे लागण्याची वेळ येऊ शकते. नवीन काम सुरू करण्याचा विचार असल्यास थांबा, अन्यथा अडचणी वाढतील. कोणत्याही कामात हयगय करू नका.

धनु राशी: गुरुच्या राशी परिवर्तनाचा थेट परिणाम धनु राशीवर होईल. करिअरमध्ये सावधानी ठेवावी. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. नोकरी आणि कुटुंब यांच्यात समतोल साधावा लागेल. हा काळ कठीण असू शकतो, वर सांगितलेले उपाय अवश्य करा.

या तीन राशींनी या काळात विशेष सतर्क राहावे लागणार आहे. तसेच गुरुवारी भगवान विष्णू आणि देवगुरु बृहस्पतीची पूजा करा. “ॐ ग्रां ग्रीं ग्रौं सः गुरवे नमः” किंवा “ॐ बृं बृहस्पतये नमः” मंत्राचा रोज जप करा. वर दिलेले उपाय न चुकता करावेत, जेणेकरून गुरुच्या अशुभ प्रभावापासून बचाव होईल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)