Ishan Kishan: चाहत्याने अशा ठिकाणी मागितला ऑटोग्राफ, इशान किशनही पाहतच राहिला, Video Viral
भारतीय फलंदाज इशान किशन सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. इशान किशनकडे चाहत्यांने एक मागणी केली होती. ऑटोग्राफसाठी चाहत्यांने ज्या ठिकाणि द्याला लावला ते पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

भारतीय यष्टीरक्षक इशान किशनने केवळ आपल्या फलंदाजीनेच नव्हे, तर आपल्या विनोदी शैलीनेही सर्वांची मने जिंकली. भारताने झिम्बाब्वेविरुद्धचा दुसरा टी-20 सामना जिंकला. सामन्यानंतर, इशान किशन चाहत्यांना भेटत असताना, त्याने एका भारतीय चाहत्याच्या टकलावर स्वाक्षरी केली. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर झटपट व्हायरल झाला आणि लोकांना इशान किशनचा हा साधा आणि गोड हावभाव खूप आवडला. सामन्यानंतर, इशान किशन स्टेडियममध्ये चाहत्यांना भेटत असताना, एका चाहत्याने एक विचित्र विनंती केली. त्या चाहत्याने किशनला त्याच्या टकलवर सही करण्यास सांगितले. या विचित्र विनंतीमुळे किशन क्षणभर गोंधळला. पण चाहत्याच्या वारंवारच्या आग्रहानंतर, त्याला आपले हसू आवरता आले नाही आणि तो तयार झाला. किशन हसला आणि त्याने चाहत्याच्या टकलवर आपल्या नावाची सही केली. या हास्यमय दृश्यामुळे आजूबाजूच्या लोकही हसू लागले आणि हा संपूर्ण प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला. सोशल मीडियावरही लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला. सर्वांनी इशानचे कौतुक केले.
दुसऱ्या सामन्यात भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा पहिल्याच षटकांमध्ये बाद झाले. त्यानंतर किशनने सूत्रे हाती घेतली आणि कठीण परिस्थितीत शानदार फलंदाजी केली. त्याने सुरुवातीला सावधपणे खेळ केला आणि नंतर आक्रमक फटकेबाजी करून झिम्बाब्वेच्या गोलंदाजांवर दबाव आणला. त्याच्या 81 धावांच्या खेळीने भारताच्या धावसंख्येत महत्त्वाची भूमिका बजावली.
View this post on Instagram
ही मालिका किशनसाठी चढ-उतारांनी भरलेली होती. पहिल्या टी20 सामन्यात त्याने 24 चेंडूंमध्ये 35 धावा केल्या. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 2 षटकार मारले होते आणि त्याचा स्ट्राईक रेट 145.83 होता. दुसऱ्या सामन्यात त्याने 81 धावा करून सर्वोत्तम कामगिरी केली. मात्र, तिसऱ्या टी20 सामन्यात तो संथ खेळपट्टीवर फारसा प्रभाव पाडू शकला नाही आणि 26 चेंडूंमध्ये केवळ 29 धावाच करू शकला. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. असे असले तरी, किशन या मालिकेतील आपल्या फलंदाजीवर समाधानी असेल. त्याने कठीण परिस्थितीत आक्रमक क्रिकेट खेळून संघासाठी उपयुक्त योगदान दिले.
