
सकाळची सुरूवात चांगली झाली की, आपल्याला दिवसभर उत्साही वाटते. यामुळे सकाळी तुम्ही काय खाता-पिता हे अत्यंत महत्वाचे आहे. सकाळी शक्यतो हेल्दी पेयांनी सुरूवात करा.

तुळशीची पाने आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. तुळशीच्या पानांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या या दूर होण्यास मदत होते.

दररोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीच्या पानांचे पाणी पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. शिवाय त्वचाही चांगली होते.

तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास हे मदत करतात.

तुम्हाला जर त्वचेच्या काही समस्या असतील तर तुळशीच्या पानांचे पाणी प्या. यामुळे त्या झटपट कमी होतात. शिवाय पिंपल्स जाण्यासही मदत होते.