Photo : कोकणात मुसळधार पाऊस, नद्यांना पूर, मगरी आल्या रस्त्यावर

crocodile on road in konkan : राज्यात गेल्या दोन, तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे कोकणातील नद्यांना पूर आला आहे. अतीवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

| Updated on: Jul 20, 2023 | 12:44 PM
1 / 5
रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. परंतु नदी, नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील खेडमधील जगबुडी नदीने धोक्यांची पातळी ओलांडली आहे. खेडच्या जगबुडी नदीची पातळी 8.60 मीटरवर गेली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. परंतु नदी, नाल्यांना पूर आला आहे. जिल्ह्यातील खेडमधील जगबुडी नदीने धोक्यांची पातळी ओलांडली आहे. खेडच्या जगबुडी नदीची पातळी 8.60 मीटरवर गेली आहे.

2 / 5
संगमेश्वरमधील शास्त्री आणि सोनवी, रत्नागिरीतील काजळी, राजापूर मधील कोदवली , लांजातील मुचकुंदी या सर्व नद्या धोक्याच्या पातळीवर आहेत.  चिपळूणमधील वाशिष्टी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. वाशिष्टी नदीची सध्याची पातळी 4.30 मीटरवर आहे.

संगमेश्वरमधील शास्त्री आणि सोनवी, रत्नागिरीतील काजळी, राजापूर मधील कोदवली , लांजातील मुचकुंदी या सर्व नद्या धोक्याच्या पातळीवर आहेत. चिपळूणमधील वाशिष्टी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. वाशिष्टी नदीची सध्याची पातळी 4.30 मीटरवर आहे.

3 / 5
रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गावर नद्यांची पाणी आले आहे. या पाण्याबरोबर मगर रस्त्यावर आल्या आहेत. महामार्गावरील पुलावर पहाटे चार वाजता मगरीचे दर्शन झाले. खेडमधील जगबुडी नदीवरील पुलावर मगर दिसत आहेत.

रत्नागिरी- मुंबई गोवा महामार्गावर नद्यांची पाणी आले आहे. या पाण्याबरोबर मगर रस्त्यावर आल्या आहेत. महामार्गावरील पुलावर पहाटे चार वाजता मगरीचे दर्शन झाले. खेडमधील जगबुडी नदीवरील पुलावर मगर दिसत आहेत.

4 / 5
रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे नद्याच्या पाण्याबरोबर मगरसुद्धा रस्त्यावर आल्या आहेत.

रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे नद्याच्या पाण्याबरोबर मगरसुद्धा रस्त्यावर आल्या आहेत.

5 / 5
रस्त्यावर मगर आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या मगरींना पुन्हा सुरक्षित स्थळी सोडावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

रस्त्यावर मगर आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या मगरींना पुन्हा सुरक्षित स्थळी सोडावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.