
गेल्या चार दिवसांपासून चिपळूण शहरात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. या पावसामुळे चिपळूण मधील वाशिष्टी नदीला पूर आला आहे. नदीचे पाणी रस्त्यांवर आले आहे.

पावसाचा जोर असल्यामुळे वाशिष्टी नदीने धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता आहे. नदीचे पाणी बाजारपेठांमध्ये घुसले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

चिपळूण शहरातील वाशिष्टी नदीच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. पावसाची संततधार चालूच राहिल्यास नदी धोक्याची पातळी गाठणार आहे.

चिपळूणमधील नदीला आलेल्या पुरामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. नदीकाठी असणाऱ्या लोकांचे स्थालंतर करण्यात आले आहे.

चिपळूणमध्ये गेल्या चार, पाच दिवसांपासून सतत पाऊस सुरु आहे. मुसळधार पाऊस सुरु असताना अजून मगील वर्षाची सरासरी पावसाने गाठली नाही.