
नातं टिकवायचं असेल तर एकमेकांचा सन्मान करणं गरजेचं आहे. जे लोक प्रेमिका किंवा पत्नीचा आदर करतात त्यांनाही मान मिळतो. अशा जोडप्यांची लव्ह लाईफ आनंदी असते.

प्रत्येक नातं हे विश्वासावर टिकतं. त्यामुळे नातं टिकावं असं वाटत असेल तर एकमेकांवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तसेच संशय नसेल नातं आणखी मजबूत होतं.

नातं टिकवण्यासाठी एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे. तसेच सहानुभूती हा सर्वात मोठा गुण आहे. एकमेकांना समजून घेत त्या त्या परिस्थिती सहानुभूती ठेवणं गरजेचं आहे. यामुळे नात्यात आणखी गोडवा निर्माण होतो.

पती पत्नी किंवा प्रेम प्रकरणात सामंजस्यपणा राखणं गरजेचं आहे. नात्यात सामंजस्यपणा असेल तर ते नातं टिकणं कठीण आहे. त्यामुळे परिस्थितीनुसार वागणं गरजेचं आहे.

कोणत्याही नात्यात धीर धरणं गरजेचं आहे. काही प्रसंगात मोठ्या मनाने माफ करणंही गरजेचं आहे. संवाद साधून काही प्रश्न सोडवले पाहीजेत. यामुळे नात्यात ओलावा निर्माण होतो.