या गावात 70 टक्के महिला तरुण वयात होतात विधवा, या कारणामुळे होतो नवऱ्याचा मृत्यू, ऐकून बसेल धक्का

भारतातील असं एक गाव जिथे 70 टक्के महिला तरुण वयातच विधवा होतात. या गावातील बहुतांश पुरुष अल्पवयातच मृत्यूमुखी पडतात. कारण ऐकून देखील तुम्हाला बसेल धक्का.

| Updated on: May 12, 2026 | 12:51 PM
1 / 6
भारतामध्ये अनेक गावं त्यांच्या परंपरा, संस्कृती किंवा इतिहासामुळे प्रसिद्ध आहेत. मात्र राजस्थानमधील एक गाव अशा कारणासाठी ओळखलं जातं, ज्यामागची सत्यकथा अत्यंत वेदनादायी आहे. राजस्थानच्या बूंदी जिल्हा परिसरातील बुढपूरा गाव आजही 'विधवांचं गाव' म्हणून ओळखलं जातं. हे नाव ऐकून धक्का बसतो, पण यामागचं वास्तव अधिक भयावह आहे.

भारतामध्ये अनेक गावं त्यांच्या परंपरा, संस्कृती किंवा इतिहासामुळे प्रसिद्ध आहेत. मात्र राजस्थानमधील एक गाव अशा कारणासाठी ओळखलं जातं, ज्यामागची सत्यकथा अत्यंत वेदनादायी आहे. राजस्थानच्या बूंदी जिल्हा परिसरातील बुढपूरा गाव आजही 'विधवांचं गाव' म्हणून ओळखलं जातं. हे नाव ऐकून धक्का बसतो, पण यामागचं वास्तव अधिक भयावह आहे.

2 / 6
या गावातील बहुतांश पुरुष अल्पवयातच मृत्यूमुखी पडतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे ‘सिलिकोसिस’ हा जीवघेणा फुफ्फुसांचा आजार. गावाजवळील सॅंडस्टोन खाणींमध्ये काम करताना उडणाऱ्या धुळीमुळे हा आजार होतो आणि हळूहळू तो कामगारांच्या जीवावर बेततो.

या गावातील बहुतांश पुरुष अल्पवयातच मृत्यूमुखी पडतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे ‘सिलिकोसिस’ हा जीवघेणा फुफ्फुसांचा आजार. गावाजवळील सॅंडस्टोन खाणींमध्ये काम करताना उडणाऱ्या धुळीमुळे हा आजार होतो आणि हळूहळू तो कामगारांच्या जीवावर बेततो.

3 / 6
बुढपूरा गावाबद्दल एक कटू सत्य सांगितलं जातं. 'या गावातील पुरुष कधीच म्हातारे होत नाहीत.' कारण तरुण वयातच त्यांचा मृत्यू होतो. गावातील 35 वर्षांवरील जवळपास 70 टक्के महिला विधवा असल्याचं सांगितलं जातं. अनेक घरांमध्ये कर्ता पुरुष नसल्याने महिलांवरच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी येते.

बुढपूरा गावाबद्दल एक कटू सत्य सांगितलं जातं. 'या गावातील पुरुष कधीच म्हातारे होत नाहीत.' कारण तरुण वयातच त्यांचा मृत्यू होतो. गावातील 35 वर्षांवरील जवळपास 70 टक्के महिला विधवा असल्याचं सांगितलं जातं. अनेक घरांमध्ये कर्ता पुरुष नसल्याने महिलांवरच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी येते.

4 / 6
सवाई मानसिंह मेडिकल कॉलेज येथील डॉक्टरांच्या माहितीनुसार, दररोज 50 ते 60 रुग्ण श्वसनाच्या तक्रारी घेऊन रुग्णालयात दाखल होतात. त्यापैकी जवळपास निम्मे रुग्ण सिलिकोसिसग्रस्त असतात. बहुतेक वेळा रुग्ण उशिरा उपचारासाठी येतात आणि तोपर्यंत आजार गंभीर टप्प्यावर पोहोचलेला असतो.

सवाई मानसिंह मेडिकल कॉलेज येथील डॉक्टरांच्या माहितीनुसार, दररोज 50 ते 60 रुग्ण श्वसनाच्या तक्रारी घेऊन रुग्णालयात दाखल होतात. त्यापैकी जवळपास निम्मे रुग्ण सिलिकोसिसग्रस्त असतात. बहुतेक वेळा रुग्ण उशिरा उपचारासाठी येतात आणि तोपर्यंत आजार गंभीर टप्प्यावर पोहोचलेला असतो.

5 / 6
घरातील कमावता पुरुष मृत्यूमुखी पडल्यानंतर महिलांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे अनेक महिलांना त्याच खाणींमध्ये काम करण्याशिवाय पर्याय राहत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या दगड फोडण्याचं काम करतात.

घरातील कमावता पुरुष मृत्यूमुखी पडल्यानंतर महिलांसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे अनेक महिलांना त्याच खाणींमध्ये काम करण्याशिवाय पर्याय राहत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या दगड फोडण्याचं काम करतात.

6 / 6
त्यांना माहीत असतं की याच कामामुळे त्यांच्या पतीचा मृत्यू झाला, पण गरीबी आणि बेरोजगारीमुळे त्यांच्याकडे दुसरा मार्ग नसतो. या कामासाठी त्यांना दिवसाला केवळ 300 ते 400 रुपये मजुरी मिळते आणि त्यावरच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

त्यांना माहीत असतं की याच कामामुळे त्यांच्या पतीचा मृत्यू झाला, पण गरीबी आणि बेरोजगारीमुळे त्यांच्याकडे दुसरा मार्ग नसतो. या कामासाठी त्यांना दिवसाला केवळ 300 ते 400 रुपये मजुरी मिळते आणि त्यावरच संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

Follow Us