
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सरकार स्वातंत्र्यदिन विशेष करण्यासाठी 'हर घर तिरंगा' मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील केंद्रीय विद्यालयातही तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेतील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने या रॅलीत सहभागी झाले होते. हातात तिरंगा घेऊन विद्यार्थ्यांनीही वंदे मातरम, घर घर तिरंगा हर घर तिरंगा , भारत माता की जय अश्या घोषणा देत यामध्ये सहभागी झाले होते.

विद्यालयापासून ते तिरंगा रॅली Armament colony, ARDE colony या परिसरातून ही तिरंगा रॅली नेण्यात आली. यावेळी शाळेच्या प्राचार्या शबाना खान, वरिष्ठ शिक्षक सहभागी झाले होते.

'हर घर तिरंगा' मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्व लोकांना आपापल्या घरांवर किंवा प्रतिष्ठानांवर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे.

सरकारच्या या मोहीमेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांच्यासोबतच नागरिकही मोठ्या उत्साहाने आनंदाने यात सहभागी होत आहेत. उद्या 15 ऑगस्टपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे.