
वास्तूशास्त्राच्या नियमाप्रमाणे घरातील सदस्यांना किचनमधून सकारात्मक उर्जा मिळत असते. किचन म्हणजे अन्नपूर्ण देवीचे स्थान आहे, असे मानले जाते. त्यामुळेच किचन नेहमी साफ आणि स्वच्छ ठेवायला हवे, असे सांगितले जाते.

वास्तूशास्त्राच्या नियमानुसार किचनमध्ये शिळी पोळी तसेच अन्य तीन वस्तू ठेवणे हे फारच वाईट समजले जाते. या वस्तू किचनमध्ये ठेवल्यास अन्नपूर्ण देवी नाराज होते, असे म्हटले जाते. अन्नपूर्णा देवीच नाराज झाल्याने घरातील सुख, शांती, समृद्धीला घरघर लागते, असे सांगितले जाते.

किचनमध्ये शिळी पोळी यासोबतच तुटलेले आणि फुटलेले भांडे ठेवू नये. तुटलेले आणि फुटलेले भांडे किचनची शोभा घालवतात. यामुळे घरात आर्थिक चणचण निर्माण होऊ शकते. त्यामुळेच किचनमध्ये तुटलेले भांडे असतील तर ते लगेच फेकून द्यावेत. असे केले तर किचनमध्ये आणि घरात पुन्हा सकारात्मक उर्जा येण्यास मदत होते.

किचनमध्ये खराब झालेला, जंग लागलेला चाकू, कात्री अशी कोणतीही धारदार वस्तू ठेवू नये. किचनमध्ये अशा गंज लागलेल्या धारदार वस्तू ठेवल्यास कुटुंबात अडचणी निर्माण होतात. किचनमध्ये फक्त साफ आणि स्वस्त वस्तू, उपकरणं ठेवायला हवीत, असे वास्तूशास्त्रात सांगितले जाते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.