
आंब्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी सारखे जीवनसत्त्वे असतात. यात स्टिरॉइड्स, अल्कलॉईड्स, राइबोफ्लेविन, थायमीन, फिनोलिक, बीटा-कॅरोटीन, फ्लेव्होनॉइड्स देखील असते. आंब्याची पाने टेरपेनोईड्स आणि पॉलीफेनॉल समृद्ध असतात. आरोग्याशी संबंधित अडचणी दूर करण्यात ते मदत करतात.

पोटाशी संबंधित समस्यांसाठी आंब्याची पाने खाऊ शकतात. यासाठी तुम्ही आंब्याची पाने गरम पाण्यात रात्रभर घाला आणि झाकून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून रिकाम्या पोटी प्या.

आंब्याची पाने त्वचेच्या जखमा भरुन काढण्यासाठी वापरले जाऊ शकते. जखम भरुन काढण्यासाठी तुम्ही आंब्याच्या पानांची पेस्ट लावू शकता.

संग्रहीत छायचित्र

आंब्याची पाने खोकला दूर करण्यासाठी वापरता येतात. यासाठी आपण आंब्याच्या पानांचा पेस्ट तयार करा. त्यात थोडासा मध घालून त्याचे सेवन करा. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)