
तांदळाचे पाण्याचा वापर करून मिळवा सुंदर त्वचा

कोंड्याच्या समस्येने तुम्ही त्रस्त असाल तर तांदळाचे पाणी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. याचा वापर केल्याने कोंड्याची समस्या दूर होते. यासोबतच डोक्याला खाज, जळजळ यासारख्या समस्यांमध्येही आराम मिळतो.

जर तुमच्या केसांची चमक गेली असेल आणि ते पूर्णपणे निर्जीव झाले असतील, तर तुम्ही एकदा तांदळाचे पाणी वापरा. तुम्हाला चार आठवड्यांत परिणाम दिसू लागतील.

भाताचे पाणी हे केसांमधील कोंड्याची समस्या दूर करण्यासही मदत करते. यासाठी केस धुण्याच्या अगोदर आपल्या केसांना भाताचे पाणी लावा. यामुळे कोंड्याची समस्या कायमची दूर होण्यास मदत होते.

1 कप तांदूळ 2 कप पाण्यात भिजवून घ्या आणि सुमारे एक तासानंतर गॅसवर उकळण्यासाठी ठेवा, जेव्हा तांदळाचे पाणी चिकट होऊ लागते, तेव्हा हे पाणी थंड झाल्यावर गाळून घ्या आणि केसांना चांगले लावा.