
उन्हाळ्यात घामोळ्या येण्याची समस्या सामान्य आहे. मात्र, या घामोळ्यांचा त्रास सामान्य नाहीये. त्यामुळे होणारी जळजळ आणि खाज तुम्हाला त्रासदायक ठरते. डॉक्टरांच्या उपचाराव्यतिरिक्त आपण हर्बल तेलाशी संबंधित घरगुती उपचारांचा अवलंब करून घामोळ्यांची समस्या दूर करू शकतो.

चंदनाचे तेल हे शीतलता प्राप्त करण्यासाठी प्रभावी मानले जाते. मनाला शांत करण्यासाठी अनेक मोठे ब्रँड त्यांच्या उत्पादनांमध्ये चंदनाचा वापर करतात. रात्री झोपण्यापूर्वी घामोळ्यांना ते लावा. यामुळे जळजळ कमी होण्यास मदत होईल.

निलगिरी तेल असे म्हणतात की या तेलाचा प्रभाव थंडावा देणारा असतो आणि त्यामुळे उष्णतेमुळे होणारा त्रास शांत करण्यासाठी ते प्रभावी मानले जाते. यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म औषधाचे काम करतात.

लवंगमध्ये असलेले औषधी गुणधर्म आतून घामोळ्यांना उष्णतेमुळे प्रभावित त्वचा दुरुस्त करण्याचे काम करतात. एक भांडे घ्या आणि त्यात लवंग तेल घालून कापूर गरम करा. हे तेल थंड झाल्यावर कापसाच्या साहाय्याने घामोळ्यांवर लावा.

पोटातील उष्णता असो किंवा त्वचेची जळजळ असो, सर्वांना शांत करण्यासाठी पुदिना सर्वोत्तम मानला जातो. घामोळ्यावर तुम्ही पुदिन्यापासून बनवलेले तेल लावू शकता. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)