
कोरफड आपल्या आरोग्याबरोबरच त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर असते. त्वचेमध्ये कुठेही जळजळ झाल्यानंतर लगेच कोरफड जेलने मसाज करा. यामुळे नक्कीच आराम मिळण्यास मदत होईल.

उन्हामुळे त्वचेवर जळजळ होण्याची समस्या वाढते. अशावेळी आपण त्वचेवर नेहमीच गुलाब पाणी लावायला हवे. यामुळे आराम मिळतो.

जळल्यानंतर लगेच जखमेवर काही काळ थंड टाकावे. यानंतर घरामध्ये असलेले खोबरेल तेल जखमेला लावा. यामुळे जळजळ कमी होईल.

खूप कमी लोकांना माहित आहे की जळलेली त्वचा दुरुस्त करण्यासाठी देखील मधाचा वापर केला जातो. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी जळजळ दूर करते.

तुम्हाला माहित आहे का की जळलेली त्वचा बरी करण्यासाठी व्हिनेगर देखील प्रभावी आहे. हे अँटीसेप्टिक म्हणून काम करते. व्हिनेगर आणि पाणी मिक्स करून त्वचेला लावा.