
मुंबईसह राज्यभरात आज दिवसभर जोरदार पाऊस झाला. हा मुसळधार पाऊस उद्या 28 जुलै रोजीही सुरु राहणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय. भारतीय हवामान विभागाने मुंबई, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांना 28 जुलैला रेड अलर्ट दिला आहे.


Rain Marathi News

हवामान विभागाच्या या इशाऱ्यानंतर राज्यातील काही जिल्हा प्रशासनांनी शाळा, कनिष्ठ आणि महाविद्यालयांना 28 जुलैला सुट्टी जाहीर केली आहे.

ठाण्यात उद्या (28 जुलै) ऑरेन्ज अलर्ट आहे. त्यामुळे ठाण्यात शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

तर पालघरला असलेल्या ऑरेन्ज अलर्टच्या इशाऱ्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केलली आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेन्ज अलर्ट आहे. रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने फक्त शाळांना सुट्टी घोषित केली आहे.

रायगड जिल्ह्यालाही ऑरेन्ज अलर्ट असल्याने पहिली ते दहावीच्या शाळांना सुट्टी असणार आहे.