
झी मराठी वाहिनीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. एका बाजूला वसुंधराचे पाय पकडून विशाखा मदतीसाठी विनंती करतेय. वसुंधराची एक अट आहे की विशाखाने एका कोऱ्या कागदावर सही करावी.

सही केल्यावर वसुंधरा त्या कागदावर लिहिते की, "तनयाला घरातील सगळी कामं एकटीला करावी लागतील." तनया सगळी घरकामं एकटीच करतेय, यामुळे ती विशाखावर चिडू लागली आहे. या सगळ्यात तनया अचानक बेशुद्ध पडते, यात ती गरोदर असल्याचं निदान होतं. हे ऐकून घरातील सगळे आनंदित आहेत. पण तनया खरंच गरोदर आहे का, असा प्रश्न आहे.

तनया तिच्या गरोदरपणाचा फायदा घेत इतरांना घराची कामं पूर्ण करायला लावते. ती स्वतःची खोली बदलून मोठी खोली मागते. ज्यामुळे वसुंधरा, आकाश आणि त्यांच्या मुलांना लहान खोलीत जावं लागतं. तरीही वसुंधरा आणि तिचं कुटुंब आनंदी आहे. ज्यामुळे तनयाला अजूनच चिड येते.

दरम्यान, वसुंधराला कळतं की विशाखाला कोणीतरी ब्लॅकमेल करतंय. ब्लॅकमेल करणारी तीच व्यक्ती आहे, ज्याने यापूर्वी आकाशवर गोळी झाडली होती. आकाश ठरवतो की वसुंधरा आणि मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी ते सगळे एकत्र सहलीला जातील.

सहलीची तयारी करत असताना वसुंधराला काही धागेदोरे मिळतात. ज्यामुळे तिला वाटतं की तनया, विशाखा आणि अखिल तिच्या आणि आकाशविरोधात कट करत आहेत. वसुंधराला संशय येतो की तनया आणि विशाखाच्या लकी सोबत काहीतरी प्लॅन करतायत. विशाखाने आकाश आणि वसुंधरा संपवण्याचा निर्धार केला आहे.