
पहलगामध्ये मंगळवारी मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे, दहशतवाद्यांनी तिथे आलेल्या पर्यटकांना आधी त्यांचं नाव विचारलं आणि नंतर त्यांच्यावर गोळीबार केला.

या हल्ल्यानंतर आता भारतानं पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत, पाकिस्तानवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. 'सिंधु' पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे.

सोबतच अटारी बॉर्डर देखील बंद करण्यात आली असून, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत, त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान आता या हल्ल्यासंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे, पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यापूर्वी पीओकेत दहशतवाद्यांची एक बैठक झाली होती. या बैठकीत हमासचे दहशतवादी देखील सहभागी झाले होते.

या बैठकीमध्ये सहभागी झालेल्या हमसाच्या दहशतवाद्यांचं स्वागत करण्यात आलं होतं. तसेच या बैठकीमध्ये भारताविरोधात चिथावणीखोर भाषणं देखील करण्यात आली होती.

समोर आलेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चिथावणी देण्यात आली होती. या बैठकीनंतर पहलगामचा हल्ला झाला.

मात्र या हल्ल्यानंतर आता पाकिस्तान चांगलाच अडचणीत सापडला असून, जगभरातून या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला जात आहे.