मान्सूनच्या चाहत्यांनो पाऊस थांबलाय तसे हे पिकनिक स्पॉट पाहून या…
मान्सूनचे आल्हाददायक वातावरण ट्रेकर्सना खुणावत असते. जुलै महिना संपला की ट्रेकर्सना किल्ले, गड किंवा धबधबे पाहायला जाण्याचे वेध लागतात.खालील ही निसर्गरम्य ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकतात.

मध्य रेल्वेच्या कर्जत-खोपोली मार्गावर पळसधरी येते आणि कर्जतपासून सुमारे ७ किमी अंतरावर आहे. या ठिकाणी पावसात अनेक ग्रुप फिरायला जात असतात.

आंबोली घाट हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहे. येथील जंगलाची समृद्धता थक्क करायला लावते.

सातारा येथील कास पठार येथील रंगीबेरंगी फुलांचे ताटवे सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पाहाण्यासारखे असतात. येथे एमटीडीसीचे रेस्टॉरंट देखील आहे.

मेघालयातील cherrapunji येथे देशातील सर्वाधिक पाऊस होतो. तेथील हिरवाई देखील प्रसिद्ध आहे.

उत्तराखंडच्या चमोली येथील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्क देखील रंगीबेरंगी फुलांसाठी फेमस आहे.

कर्नाटकातील Coorg येथील कॉफीच्या बागा आणि धबधबे पाहण्यासाठी लोक देशभरातून जात असतात.

केरळातील MUNNAR हे हिरवाईने नटलेले असून उत्तम हिल स्टेशन असून ते वर्षाचे १२ महिने थंड असते. मात्र पावसात त्याला पाहणे हे नेत्रसुखद असते.