
सूर्योदयापूर्वी उठा अनेकांना रात्री झोप न येण्याची समस्या सतावत असते. ज्यांना निद्रानाशाची समस्या असेल त्यांनी सकाळी लवकर उठण्याची सवय लावावी. कारण जे लवकर उठतात त्यांना रात्री लवकर आणि निवांत झोप लागते. शिवाय लवकर उठल्यामुळे दिवसभराची कामे वेळेत पूर्ण होतात.

देवाचे नाव घ्या गरुड पुराणानुसार रोज सकाळी उठून सप्तऋषींच्या नावाचा जप केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. याशिवाय जर तुम्ही आर्थिक संकट आणि गरिबीतून जात असाल तर सप्तऋषींच्या नामजपाने आर्थिक समस्याही दूर होतात. कश्यपोत्रिर्भरद्वाजो विश्वामित्रोथ गौतमः। जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तैते ऋषयः स्मृताः॥

भगवान श्रीकृष्णाची पूजा सकाळी पूजेच्या ताटात चंदनाचा ‘ओम’ बनवावा . यानंतर त्यामध्ये तुळशीची पाने अर्पण करा. त्यावर श्रीकृष्णाला बसवून नारायण-नारायणाचा जप करत त्याला पाण्याचा अभिषेक करावा. आंघोळीनंतर देवाला आसनावर बसवून वस्त्र घाला. यानंतर देवाची आरती करावी. त्यांना नैवेद्य अर्पण करून नमस्कार करावा.

सूर्याला पाणी अर्पण करा सकाळी उठल्यानंतर भगवान सूर्यदेवांना अवश्य जल अर्पण करा. ज्या घरांमध्ये लोक त्याचे नियमित पालन करतात, तेथे गरिबी दूर राहते. मुलांच्या हाताने सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण केल्यास त्यांच्या बुद्धीचाही विकास होतो. सूर्याला जल अर्पण करताना सात वेळा प्रदक्षिणा करून खाली लिहिलेल्या मंत्रांचा जप करावा. 1. ओम सूर्याय नमः 2. ओम भानवे नमः 3. ओम खगाय नमः 4. ओम भास्कराय नमः, 5. ओम आदित्यय नमः

वास्तुशास्त्रानुसार घरातील उत्तर, ईशान्य आणि वायव्य कोन स्वच्छ आणि रिकामे ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. घराच्या या दिशांना धनाची देवता कुबेर वास करतो, असे मानले जाते. म्हणूनच घराचे सर्वच कोपरे स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.