
मुंबई-अहमदाबाद दरम्यान अंतर कापण्यासाठी एरवी सात तास लागतात. पण बुलेट ट्रेन हेच अंतर 2 तास 7 मिनिटात कापेल.

ही बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडोरमध्ये 12 स्टेशन्समधून जाईल. यात ठाणे, विरार, बोइसर, वापी, सूरत आणि वडोदरा स्टेशन्स आहेत.

जापानची बुलेट ट्रेन आपला स्पीड आणि सुरक्षेसाठी ओळखली जाते. भारताची पहिली बुलेट ट्रेन रेल्वे सुरक्षा आणि विश्वसनीयता या निकषांवर यशस्वी ठरेल.

भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा अधिकतम वेग 320km/h असेल. म्हणजे एका तासात 320 किलोमीटर अंतर कापण्याची या ट्रेनची क्षमता आहे.

बुलेट ट्रेनचा अधिकतम स्पीड 320 km/h असेल. पण 280 किमी प्रतितास वेगाने ही ट्रेन धावेल असं बोललं जातय. देशातील पहिली बुलेट ट्रेन 2026 च्या अखेरीस मुंबई-अहमदाबाद कॉरिडोर दरम्यान धावेल असा दावा केला जातोय.