
जगात अशा काही चमत्कारिक जागा आहेत, त्याविषयी अजूनही कोणालाच काहीही समजू शकलेलं नाही. भारतात तर काही ठिकाणी फारच चमत्कारीक ठिकाणं आहेत.

भारतातील वाराणसी येथे एक विहीर आहे. तेथील लोकांच्या मान्यतेनुसार या विहिरीत डोकावून पाहिल्यावर आपला मृत्यू कधी होतो ते लगेच समजते.

या विहिरीचे नाव चंद्रकूप असे आहे. या चंद्रकूप विहिरीत डोकावून पाहिल्यावर सावलीच्या मदतीने आपला मृत्यू कधी होईल, याबाबत समजते, अशी तेथील लोकांची धारणा आहे.

विहिरीत डोकावून पाहिल्यावर तुमची सावली जर व्यवस्थित दिसून आली तर तुम्हाला कोणताही धोका नाही, असा त्याचा अर्थ होतो. मात्र तुम्ही विहिरीत डोकावून पाहिल्यावर तुमची सावली दिसत नसेल तर पुढच्याच सहा महिन्यांत तुमचा मृत्यू होण्याची शक्यता असते असा समज आहे.

चंद्रकूप या विहिरीची निर्मिती खुद्द चंद्रदेवानेच केली आहे, असे तेथील लोक मानतात. चंद्रदेवाने अनेक वर्षे भगवान महादेवाची तपश्चर्या केली होती. त्यानंतर महादेवाने प्रसन्न होऊन त्या विहिरीला रहस्यमयी शक्तीचे वरदान दिले होते, अशी आख्यायिका आहे.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.