बिहार विजयाचा आनंदोत्सव, भारतात फॅमिली पक्षांचं जाळं, नरेंद्र मोदींचे विरोधकांवर टीकास्त्र
काश्मीर ते कन्याकुमारीपासून भारतात फॅमिली पक्षांचं जाळं निर्माण झालं आहे. देशातील प्रत्येक नागरिक ही गोष्ट जाणतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. (Narendra Modi Criticise opposition parities as family parties)
-
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपनं दिल्ली येथे बिहार विजयाचा जल्लोष साजरा केला.
-
-
भाजपच्या दिल्ली येथील कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता.
-
-
देशातील युवकांना आवाहन करतो. युवकांनी यावं, भाजपमध्ये सामील व्हावं. देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी युवकांनी भाजपमध्ये सामील व्हावं. युवकांनी आपल्या स्वप्नांसांठी भाजपमध्ये यावं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
-
-
देशात काही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांची हत्या केली जात आहे. हत्या करुन मत मिळत नाही. आपण लोकशाहीसाठी समर्पित आहोत. भाजपतील कार्यकर्ते आपल्या उद्देशापासून तसूभरही डगमगणार नाहीत. निवडणुकीतल यश भाजपला ताकद देत राहतात. देशाला मी विश्वास देतो की आम्ही आमचे काम निष्ठेने करत राहू, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
-
-
भारतातील युवापिढी लोकशाहीवर विश्वास ठेवते. युवक आपल्या हक्कांविषयी जागरुक असतो. काश्मीर ते कन्याकुमारीपासून भारतात फॅमिली पक्षांचं जाळं निर्माण झालं आहे. देशातील प्रत्येक नागरिक ही गोष्ट जाणतो. घराणेशाहीवाले पक्ष देशाच्या लोकशाहीला घातक आहेत, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.
-
-
प्रत्येक घरात वीज, 1 रुपयात सॅनिटरी पॅड, प्रत्येक घरात पाणी यासाठी भाजपने प्रयत्न केला. भाजपला महिलांनी सायलेंट व्होटर म्हणून मतदान केले. बिहारच्या महिलांनी भाजपला साथ दिली. मी महिलांचे आभार मानतो, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.