
अपशब्द - पैसा आल्यानंतर लोकांच्या जीवनशैलीत बदल होतो. राहाणीमानाचा स्थर उंचावतो. त्याच प्रमाणे बोलण्यातील लकब बदलते. अनावधानत आपण एखाद्याचा अपमान सुद्धा करतो. चाणक्य नीतीनुसार, देवी लक्ष्मी अशा ठिकाणी कधीही राहत. त्यामुळे इतरांशी बोलताना आदराने बोला.

राग - क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर माणसांने संयमाने वागावे. असे करण्यात जर तुम्ही अयशस्वी झालात तर तुमच्या संपत्तीचा नाश होतो .

गर्व - माणसाने कधीही गर्व करू नये. अनेकांना धन-संपत्ती आल्याने अभिमानही येतो. यामुळे मानवाचा नाश होतो, जेथे गर्व असतो तेथे देवी लक्ष्मी कधीही वास करत नाही.

वाईट सवयी - पैसा मिळाल्यानंतर अनेक लोक असे छंद जोपासतात जे त्यांच्या नाशाचे कारण बनतात. चाणक्य नीतीनुसार, त्या लोकांना याची जाणीव होते जेव्हा ते सर्व काही गमावतात.