पाणीपुरी आवडीने खाता, पण त्याचे फायदे माहिती आहेत का?

पाणीपुरी खायला प्रत्येकाला आवडते. मात्र पाणी पुरी तुमच्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल. पुदिना, चिंच, आले आणि कोथिंबीर यापासून बनवलेले हे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

Updated on: Oct 06, 2025 | 7:12 PM
1 / 5
पाणीपुरीच्या पाण्यात चिंच आणि आले टाकलेले असते. यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांना आराम मिळतो आणि हृदयाचे आरोग्य देखील सुधारण्यास मदत होते.

पाणीपुरीच्या पाण्यात चिंच आणि आले टाकलेले असते. यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांना आराम मिळतो आणि हृदयाचे आरोग्य देखील सुधारण्यास मदत होते.

2 / 5
पाणीपुरीच्या पाण्यात पुदिना आणि कोथिंबीर देखील टाकलेले असतात. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यात मदत होते,  तसेच यकृत आणि पचनसंस्था देखील मजबूत बनते.

पाणीपुरीच्या पाण्यात पुदिना आणि कोथिंबीर देखील टाकलेले असतात. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यात मदत होते, तसेच यकृत आणि पचनसंस्था देखील मजबूत बनते.

3 / 5
पाणीपुरी खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे, पाणीपुरीचे पाणी पोटातील गॅस आणि अपचन दूर करण्यास मदत करते. या पाण्यामुळे पचन सुधारते आणि पोट हलके होते.

पाणीपुरी खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे, पाणीपुरीचे पाणी पोटातील गॅस आणि अपचन दूर करण्यास मदत करते. या पाण्यामुळे पचन सुधारते आणि पोट हलके होते.

4 / 5
पाणीपुरीच्या पाण्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, ज्यामुळे शरीर रोगांशी लढण्यासाठी सक्षम बनते.

पाणीपुरीच्या पाण्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, ज्यामुळे शरीर रोगांशी लढण्यासाठी सक्षम बनते.

5 / 5
पुदिना आणि कोथिंबीर यांच्यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करतात. यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते आणि फ्रेश वाटते. पाणीपुरीची गोड आणि आंबट चव मेंदूमध्ये हॅप्पी हार्मोन्स सोडते, त्यामुळे तणाव कमी होतो.

पुदिना आणि कोथिंबीर यांच्यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करतात. यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते आणि फ्रेश वाटते. पाणीपुरीची गोड आणि आंबट चव मेंदूमध्ये हॅप्पी हार्मोन्स सोडते, त्यामुळे तणाव कमी होतो.