
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धान्य साधना 1 जून रोजी संध्याकाळपर्यंत सुरु राहणार आहे. ज्या शिळेवर स्वामी विवेकानंद यांनी धान्य केले होते, त्याच शिळेवर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धान्य सुरु केले आहे.

धान्य साधने दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सकस आहारच घेणार आहे. अन्नाचा एक कणही ते खाणार नाही. नारळ पाणी आणि द्राक्षांचा रस ते घेणार असल्याची माहिती देण्यात आली. पंतप्रधान धान्य व्रताचे पूर्ण पालन करणार असून धान्य कक्षाच्या बाहेर येणार नाही.

भारताच्या दक्षिणी भागात कन्याकुमारीत पूर्व आणि पश्चिम तट एकत्र येतात. या ठिकाणी हिंद महासागर, बंगालचा उपसागर आणि अरब सागर एकत्र येतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्वामी विवेकानंद यांचा प्रभाव आहे. त्यामुळेच विवेकानंद यांना ज्या ठिकाणी आपल्या जीवनाचे लक्ष्य मिळाले त्याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहचले.

प्रधानमंत्री हेलिकॉप्टरने तिरुवनंतपूरमपासून 97 किमी लांब तमिळनाडूमधील कन्याकुमारीत आले. या ठिकाणी विवेकानंद मंडपमच्या 300 मीटर लांब त्यांचे हेलिकॉप्टर उतरले.

कन्याकुमारीत पोहचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरळ भगवती अम्मान मंदिरात गेले. त्यांनी विवेकानंद रॉक मेमोरियल येथे जाण्यापूर्वी पूजा केली. भगवती अम्मान मंदिराचा उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये मिळतो.