
भारत देश आज 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण पार पडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी तिरंग्याला सलामी दिली.

मागचे सलग दहा वर्षे नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत. आजही त्यांनी आपल्या भाषणातून भारताच्या भविष्याचा वेध घेतला.

मेरे प्यारे 140 करोड परिवारजन…, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. मणिपूरच्या मुद्द्यावरही नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं.

भारत देश हा युवांचा देश आहे. मला देशातील तरूणांवर विश्वास आहे. देश प्रगती करतो आहे. येत्या काळात आपण आणखी पुढे जाऊ, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.