Rahul Gandhi : आम्ही भाजपला हरवलंय, आता केवळ…; राहुल गांधी यांचं मोठं वक्तव्य
Congress Leader Rahul Gandhi and Priyanka Gandhi at Telangana : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी सध्या तेलंगणामध्ये आहेत. तिथे त्यांनी स्थानिक लोकांशी संवाद साधला. तसंच भाजपवर राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी काय म्हटलंय? वाचा सविस्तर...

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या सध्या तेलंगणामध्ये आहेत. तिथे त्यांनी स्थानिकांशी भेटीगाठी घेतल्या.

राहुल आणि प्रियांका गांधी यांनी यावेळी रामप्पा मंदिरात जात दर्शन घेतलं. विजयभेरी यात्रेचा शुभारंभही त्यांनी यावेळी केला.

तेलंगणामध्ये आम्ही भाजपला केव्हाच हरवलं आहे. आता केवळ त्यांची बी टीम असणाऱ्या बीआरएसला हरवायचं आहे, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.

राहुल गांधी यांनी बीआरएसवर जोरदार निशाणा साधला. 'बीजेपी रिश्तेदार समिती', असा बीआरएसचा उल्लेख केला. या तेलंगणा दौऱ्याचे फोटो राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेत.

राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना यावेळी राजीव गांधी यांची प्रतिमा भेट देण्यात आली. स्थानिक काँग्रेस नेत्यांनी त्यांना ही भेट दिली.

राहुल गांधी यांनी स्थानिकांशी संवाद साधला. त्यांच्याशी चर्चा केली. तेव्हाचा हा फोटो...