
राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल करंजवडे गावातील ग्रामस्थांनी प्रतीक जयंत पाटील यांचा सत्कार केला.

कार्यक्रमापूर्वी भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावातील लहान थोर, माता - भगिनी सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यांच्या कौतुकाच्या वर्षावाने मला काम करण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली असं पाटील यांनी फेसबुकच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

१९८४ साली आ. जयंत पाटील साहेबांची चेअरमनपदी निवड झाली होती. तेव्हाही आपण सर्वांनी त्यांचा भव्य सत्कार केला होता.

जयंत पाटील यांना मिळालेले प्रेम मलाही भरभरून मिळते आहे, हे माझे भाग्य आहे. आपले आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहतील हा विश्वास आहे.

चेअरमनपद मोठ्या जबाबदारीने मी स्वीकारले आहे. स्व. राजारामबापू पाटील हे शेतकऱ्यांसाठी कणकण झिजले. त्यांचेच स्वप्न पुढे घेऊन आम्ही जात आहोत.

ठिबक योजना, ड्रोन फवारणी या आणि अशा अनेक आधुनिक योजना राबविण्याची संधी मला मिळाली. यापुढेही आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत शेतकऱ्यांचा विकास साधण्याचा ध्यास आहे.