
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागला. यामध्ये चार राज्यांमध्ये भाजपने विजय मिळवला आहे. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजप मुख्यालयातून जनतेला संबोधित केले. यावेळी अमित शाह, राजनाथ सिंह, नितिन गडकरी, जेपी नड्डा आदि भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

आज उत्साहाचा दिवस आहे. उत्सवाचा दिवस आहे. हा उत्सव भारताच्या लोकशाहीचा असे सांगत या निवडणुकीत भाग घेणाऱ्या सर्व मतदारांचे अभिनंदन करीत पुन्हा सत्ता देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मोदींनी मतदारांचे आभार मानले.

यावेळी पंतप्रधान मोदींनी भाजपला बंपर विजय कसा मिळाला याचे सिक्रेट सांगितले. त्याचबरोबर विरोधकांवर जोरदार निशाणाही साधला.

महाराष्ट्रातील नवाब मलिक प्रकरणावरुन नरेंद्र मोदींनी शरद पवारांवरही निशाणा साधला आहे. यावेळी काँग्रेसच्या घराणेशाहीपासू ते महाराष्ट्रात सुरू असलेल्या ईडीविरोधातल्या राजकारणापर्यंत सर्वांचा समाचार घेतला.
