
राणी मुखर्जी हिने एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. राणी मुखर्जीने आपल्या करिअरची सुरूवात ही 1996 मध्ये केली. विशेष म्हणजे गुलाम हा तिचा दुसराच चित्रपट होता.


राणी मुखर्जी हिला या चित्रपटाच्या वेळी आमिर खान याचा निर्णय अजिबात आवडला नव्हता. गुलाम या चित्रपटामध्ये राणी मुखर्जी हिचा आवाज डबिंग करण्यात आला होता.

राणी मुखर्जी ही बाॅलिवूडमध्ये नवीन अभिनेत्री असल्याने त्यावेळी ती यावर काहीच बोलू शकली नाही. गुलाब चित्रपटामध्ये राणी मुखर्जी हिचा खरा आवाज नव्हता.

आवाज डबिंग करणे आपल्याला अजिबात आवडले नसल्याचे राणी मुखर्जीने म्हटले. विशेष म्हणजे राणी मुखर्जीचा आवाज डबिंग करणे हा योग्य निर्णय असल्याचे त्यावेळी आमिरने म्हटले होते.