
सलमान खानने आतापर्यंत लग्न का केलेलं नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. आता मात्र त्याने लग्न न करण्याची खरी पाच कारणं समोर आली आहेत. खुद्द सलमान खाननेच याबाबत सांगितले आहे.

सलमान खानने कॉमेडियन कपिल शर्माच्या तिसऱ्या सिझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये हजेरी लावली होती. यावेळीी द ग्रेड इंडियन कपिल शर्मा शोमध्ये सलमानने लग्न न करण्याची पाच कारणं सांगितली आहेत.

मश्किल अंदाजात सलमानने सांगितले की, अगोदर नात्यांत त्याग, सहनशीलता असायची. आता नाते छोट्या-छोट्या कारणावरून तुटतं.

आजकाल नात्यांत सहनशीलता फार कमी झाली आहे. छोट्या गौरसमजांमुळे नाते तुटते. लग्न न करण्याचं दुसरं कारण सांगताना सलमान खान मस्करीत म्हणाला की, घटस्फोट घेण्यासाठी आजकाल कोणतेही कारण शोधले जाते.

सलमान खानने यावेळी पोटगीचाही उल्लेख केला. घटस्फोट झाल्यानंतर मुली आजकाल पोटगीच्या रुपात खूप सारे पैसे घेऊन जातात, असं सलमान विनोदबुद्धीने म्हणाला.

लग्नानंतर स्वातंत्र्य संपून जातं. कुटुंबाला प्राधान्य द्यावं लागतं. यातच माणूस फसून जातो, असंही सलमान खानने सांगितले.