
दुष्काळग्रस्त येवला तालुक्यात गेल्या 23 वर्षापासून येवला तालुक्यातील कोटमगाव बुद्रूक येथील शेतकऱ्याने शेततळ्याची निर्मिती करून शेवग्याचे पीक घेत असून याद्वारे तो लाखोचे उत्पन्न देखील घेत असल्याने शेवगा लागवड बाबत इतर शेतकऱ्यांना ही माहिती पुरवत आहे.

येवला तालुक्यातील कोटमगाव बुद्रूक येथील नितीन कोटमे हा शेतकरी गेल्या 23 वर्षापासून शेवग्याचे पीक घेत असून याद्वारे तो लाखोचे उत्पन्न दरवर्षी मिळत आहेत.

या शेतकऱ्याने आपल्या साडेतीन एकर क्षेत्रामध्ये शेवग्याची लागवड 2000 साली केली होती.

पावसाचे प्रमाण येवला तालुक्यात कमी असल्याने शेत तळ्याची निर्मिती केली, त्यावर त्याने मोठ्या कष्टाने आपल्या शेवग्याचे बाग टिकवली.

दरवर्षी या शेतकऱ्याला चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये उत्पादन खर्च येत असून त्यातून त्याला तीन ते चार लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.

बाजारात तीस ते चाळीस रुपये भाव शेवग्याला मिळत असल्याने यावर्षी देखील भरघोस उत्पन्न या शेतकऱ्याला मिळणार असून योग्य पाण्याचे नियोजन व औषधाचा वापर न करता या शेतकऱ्याने शेवग्याची बाग फुलवली आहे.

या शेतकऱ्याकडे शेवग्याची बाग बघण्यास आलेल्या सर्व शेतकऱ्यांना लागवडीबाबत पुरेपूर माहिती हा शेतकरी देत असतो.