
शेतीचा व्यवसाय आतबट्ट्याचा झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजा हतबल झालेला आहे.

सोलापूरात पावसाने मोहोळ बेगमपुरात शेतात साचलेल्या पाण्यात बसून युवा शेतकऱ्याने कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना आर्त हाक दिली आहे.

कालच्या मुसळधार पावसामुळे 2 एकरावरील टोमॅटो पिकाच्या बागेत पाणीच पाणी झाल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे.

राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक केवळ एकमेकांवर टीका करतातर शेतकऱ्याचा प्रश्न कोणीही मांडत नाही अशी शेतकऱ्याची व्यथा आहे.

कोणी रम्मी खेळली, कोणी मारामारी केली, तर कोणाचा बारच आहे, यावरच नेते मंडळी बोलतात मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न त्यामुळे बाजूला पडल्याचे दिसत आहे.

युवा शेतकरी लखन माने (युवा शेतकरी, बेगमपूर, मोहोळ) याने म्हटलंय की माझ्या शेतात 10 ते 12 लाखाचे टोमॅटो पीक पावसामुळे वाया जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे सरकारला लखन माने या शेतकऱ्याने विनंती केली आहे की आम्हाला पंचनामा नको,नुकसान भरपाई नको तर आमच्या पिकाला हमीभाव द्यावा अशी विनंती या शेतकऱ्याने केली आहे.