
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सामना खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात आपल्या सातव्या विजयासाठी सज्ज आहे.

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने मुंबईतील खराब हवा आणि प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. रोहितने सोशल मीडिया पोस्ट करत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर बीसीसीआय एक्शन मोडमध्ये आली आहे.

टीम इंडिया-श्रीलंका सामन्यादरम्यान फटाके फोडण्यास बंदी आहे. हवेचा दर्जा आणखी घसरुन नये यासाठी हा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ही घोषणा केली आहे.

बीसीसीआयच्या निर्णयामुळे आता सामन्याच्या निकालानंतर फटाके फोडून जल्लोष करता येणार नाही. रोहितने इंस्टाग्रामवर पोस्ट करत मुंबईच्या हवामानाबाबत भाष्य केलं होतं.

बीसीसीआय सचिव जय शाह मुंबईतील घसरत्या हवेच्या दर्जाबाबत गंभीर आहेत. ते याबाबत आयसीसीसोबत चर्चा करणार आहेत.