
भारताने गेल्या दहा वर्षात एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. मधल्या काळात काही संधी आल्या पण त्याचं जेतेपदात रुपांतर करण्यात आलं नाही. 2013 मध्ये चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली होती. तर 2011 मध्ये वनडे वर्ल्डकप स्पर्धा जिंकून 12 वर्षे झाली आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्याचा हेतुने टीम इंडिया उतरणार आहे. (Photo :ICC)

टीम इंडियात शेवटच्या क्षणी आर अश्विन याची निवड झाली आहे. अक्षऱ पटेल याला आशिया कप स्पर्धेत दुखापत झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे टीम इंडियाने जेतेपद मिळवण्यास आर अश्विन आणि विराट कोहली यांच्या नावावर एका विक्रमाची नोंद होणार आहे. (Photo : PTI)

वनडे वर्ल्डकपच्या इतिहासात भारताचा कोणताच खेळाडू दोन वर्ल्डकप विजेत्या संघात खेळलेला नाही. 2011 वर्ल्डकप विजेत्या संघात आर अश्विन आणि विराट कोहली खेळले आहे. आता रोहित शर्मा याच्या नेतृत्वात विराट कोहली आणि आर अश्विन खेळणार आहेत. (Photo : BCCI Twitter)

भारतात एकपेक्षा अधिक वनडे वर्ल्डकप खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट आणि अश्विनचा समावेश होणार आहे. मोहम्मद अझरुद्दीन (1987,1996), नवजोतसिंह सिद्धू (1987,1996), मनोज प्रभाकर (1987,1996), सचिन तेंडुलकर (1996,2011), विराट कोहली (2011, 2023), आर अश्विन (2011, 2023). (Photo : File PIC)

भारताचा वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. 8 ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. त्यानंतर 11 ऑक्टोबरला अफगाणिस्तान आणि 14 ऑक्टोबरला पाकिस्तानशी लढत होणार आहे. (Photo- ICC)

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज. (Photo :ICC)