
पहिल्या सहा चेंडूत नेमकं असं काय घडलं की पराभव झाला, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पण 2003 वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवाचं निरीक्षण केलं की ही बाब लक्षात येऊन जाईल. पण तेव्हा पहिल्या सहा चेंडूत असं काय घडलं होतं?

दुसऱ्या डावात भारताकडून पहिलं षटक जसप्रीत बुमराहने टाकलं. 2003 साली झहीर खानने षटक टाकलं होतं. या दोन्ही षटकांमध्ये साम्य दिसून येईल.

झहीर खानने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2003 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पहिलं षटक टाकलं आणि 15 धावा दिल्या. तसंच जसप्रीत बुमराहच्या बाबततीत घडलं आणि पहिल्या षटकात 15 धावा आल्या.

2003 आणि 2023 स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने होते. दोन्ही वेळेस ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं. त्यामुळे 12 वर्षानंतर पुन्हा वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न भंगलं.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने 50 षटकात सर्वबाद 240 धावा केल्या आणि विजयासाठी 241 धावांचं आव्हान दिलं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 4 गडी गमवून 43 षटकात पूर्ण केलं.