
टीम इंडिया वर्ल्ड कप 2023 अंतिम फेरीतील पराभव विसरुन पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी तयार आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हा 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा कॅप्टन असणार आहे.

वर्ल्ड कपनंतर या मालिकेसाठी टीम इंडियाचे कोच आणि कर्णधार दोन्ही नवे आहेत. सूर्याकडे टीम इंडियाची सूत्रं आहेत. तर व्हीव्हीएस लक्ष्मण याच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी आहे.

प्रसिध कृष्णा याच्यासह टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी सराव केला. यावेळेस व्हीव्हीएस लक्ष्मण याच्या मार्गदर्शनात युवा खेळाडूंनी घाम गाळला.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी वॉशिंग्टन सुंदर यालाही संधी देण्यात आली आहे. सुंदरला आशिया कप फायनलमध्ये अक्षर पटेलच्या जागी संधी दिली होती. त्यानंतर वॉशिंग्टन आता मैदानात उतरणार आहे.

तसेच टीम इंडियात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतून अक्षर पटेल याने कमबॅक केलंय. अक्षर दुखापतीमुळे वर्ल्ड कपमधून बाहेर पडला होता.

तसेच सूर्यकुमार यादव हा टीम इंडियाचा 13 वा टी 20 कर्णधार ठरला आहे. याआधी टीम इंडियाचं 12 जणांनी नेतृत्व भूषवलं आहे.