
मुंबई इंडियन्सची स्पर्धेतील सुरुवात पराभवाने झाली. पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सला 8 विकेट्स आणि 22 चेंडू राखून पराभूत केलं. (Photo : IPL/BCCI)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनंतर चेन्नई सुपर किंग्सने मुंबईला पराभवाचं पाणी पाजलं. चेन्नईने मुंबईला 7 गडी आमि 11 चेंडू राखून पराभूत केलं. (Photo : IPL/BCCI)

तिसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कमबॅक केलं. दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी दिलेलं 173 धावांचं आव्हान 4 गडी गमवून पूर्ण केलं. मुंबईने दिल्लीवर 6 गडी राखून विजय मिळवला. (Photo : IPL/BCCI)

चौथ्या सामन्यात मुंबई कोलकात्याला पराभूत केलं. कोलकात्याने 20 षटकात 6 गडी गमवून 185 धावा केल्या आणि विजयासाठई 186 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान मुंबईने 5 गडी आणि 14 चेंडू राखून पूर्ण केलं.(Photo : IPL/BCCI)

पाचव्या सामन्यात मुंबईने हैदराबादला पराभूत केलं. मुंबई 193 धावांचं आव्हान हैदराबादला दिलं होतं. मात्र हैदराबादचा संघ सर्वबाद 178 धावाच करू शकला. मुंबई हैदराबादवर 14 धावांनी विजय मिळवला. (Photo : IPL/BCCI)

सहाव्या सामन्यात पंजाब किंग्सने मुंबईची गाडी रुळावरून खाली आणली. पंजाबने मुंबईला विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं. पण मुंबईचा संघ 201 धावा करू शकला. मुंबईचा 13 धावांनी पराभव झाला. (Photo : IPL/BCCI)

सातव्या सामन्यात गुजरातने मुंबईला आस्मान दाखवलं. मुंबईला विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं. मात्र मुंबईचा संघ 152 धावा करू शकला. मुंबईचा 55 धावांनी पराभव झाला. (Photo : IPL/BCCI)

आठव्या सामन्यात मुंबई कमबॅक करत राजस्थान रॉयल्सला पराभूत केलं. राजस्थानने 213 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान मुंबईने 6 विकेट्स आणि 3 चेंडू राखून पूर्ण केलं. (Photo : IPL/BCCI)

पंजाबकडून साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात मिळालेल्या पराभवाचा वचपा मुंबईने दुसऱ्या सामन्यात काढला. मुंबईला विजयासाठी 215 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 6 विकेट्स आणि 7 चेंडू राखून पूर्ण केलं. (Photo : IPL/BCCI)

साखळी फेरीत चेन्नईचा संघ दुसऱ्यांदा मुंबईवर भारी पडला. चेन्नईने मुंबईला 20 षटकात 139 धावांवर रोखलं. विजयासाठी मिळालेलं 140 धावांचं आव्हान 17.4 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. (Photo : IPL/BCCI)

साखळी फेरीत पहिल्या सामन्यात आरसीबीने मुंबईला पराभूत केलं होतं. पण मुंबईने दुसऱ्या सामन्यात याची परतफेड केली. आरसीबीने विजयासाठी 200 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान मुंबईने 6 विकेट्स आणि 21 चेंडू राखून पूर्ण केलं. (Photo : IPL/BCCI)

मुंबई इंडियन्सने गुजरात देखील दुसऱ्या फेरीत चांगलाच इंगा दाखवला. मुंबईने विजयासाठी 219 धावांचं आव्हान दिलं. गुजरातचा संघ फक्त 191 धावा करू शकला. मुंबईने हा सामना 27 धावांनी जिंकला.(Photo : IPL/BCCI)

मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स प्लेऑफमध्ये भिडणार आहेत. पण साखळी फेरीत लखनऊचा संघ मुंबईवर भारी पडला होता. लखनऊने 177 धावांचं आव्हान मुंबईला दिलं होतं. पण मुंबईचा संघ 5 गडी गमवून 172 धावा करू शकला. (Photo : IPL/BCCI)

मुंबई इंडियन्सने सनराईजर्स हैदराबाद संघाला दुसऱ्यांदा पराभूत करत दोन गुणांची कमाई केली. यामुळे प्लेऑफमध्ये जाण्याचा मार्ग सुकर झाला. हैदराबादने 201 धावांचं आव्हान दिलं होतं. मुंबईने हे आव्हान 8 गडी आणि 12 चेंडू राखून पूर्ण केलं. (Photo : IPL/BCCI)