
टीम इंडियाचा स्टार बॅट्समन विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हे आयडियल कपल आहेत. दोघेही सोशल मीडियावर एक्टीव्ह असतात. मात्र सध्या विराटने सोशल मीडियावर टाकलेल्या एका पोस्टमुळे या कपलमध्ये खटके उडाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


विराटने गुरुवारी एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोत विराट अनुष्काच्या हातात हात टाकून पूल ओलांडतान दिसतोय. हा फोटो नेटकऱ्यांना आवडलाय. मात्र त्या फोटो कॅप्शनमुळे या दोघांमध्ये खटके उडाल्याचा कयास लावला जातोय.

"असंख्य प्रश्न आणि संशयाच्या दरीला ओलांडून मी या प्रेमात आहे", असं विराटने या फोटोला कॅप्शन दिली आहे. यामुळे नेटकऱ्यांना या दोघांमध्ये खटके उडालेत की काय, अशी शंका आहे.

अनुष्काने कायम संकटात विराटची साथ दिलीय. "मी जेव्हा आऊट ऑफ फॉर्म होतो तेव्हा माझा संताप व्हायचा. मी अनुष्कावर संतापायचो. तसेच मी मनातली प्रत्येक गोष्ट अनु्ष्कासोबत शेअर करायचो", असं विराटने एका मुलाखतीत म्हणाला होता.