Photos : सूर्या-कोहली अन् अक्षरची जोरदार कामगिरी, पाहा खास फोटो

| Updated on: Sep 25, 2022 | 11:39 PM

मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात टीम इंडियानं शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली चांगलाच फॉर्मात दिसला. वाचा...

1 / 4
भारत-ऑस्ट्रेलियाच्या टी-20 सीरिजच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात टीम इडियानं (Team India) सहा विकेट राखून विजय मिळवला आहे.

भारत-ऑस्ट्रेलियाच्या टी-20 सीरिजच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात टीम इडियानं (Team India) सहा विकेट राखून विजय मिळवला आहे.

2 / 4
सामन्यात सूर्यकुमार यादवची आतषबाजी आणि विराट कोहलीची (Virat Kohli) थेट खेळीनं महत्त्वाची भूमिका बजावली. विश्वचषकापूर्वीचा हा जबरदस्त सामना क्रिकेटप्रेमींना पहायला मिळाला आणि टीम इंडियाचं चहुकडे कौतुक होऊ लागलं.

सामन्यात सूर्यकुमार यादवची आतषबाजी आणि विराट कोहलीची (Virat Kohli) थेट खेळीनं महत्त्वाची भूमिका बजावली. विश्वचषकापूर्वीचा हा जबरदस्त सामना क्रिकेटप्रेमींना पहायला मिळाला आणि टीम इंडियाचं चहुकडे कौतुक होऊ लागलं.

3 / 4
अक्षर पटेलनं मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच आपल्या वेगवान गोलंदाजीनं पुन्हा ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत आणलं. यामुळेच वेगवान सुरुवात करूनही ऑस्ट्रेलियन संघ 17 षटकांत केवळ 140 धावा करू शकला.

अक्षर पटेलनं मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच आपल्या वेगवान गोलंदाजीनं पुन्हा ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत आणलं. यामुळेच वेगवान सुरुवात करूनही ऑस्ट्रेलियन संघ 17 षटकांत केवळ 140 धावा करू शकला.

4 / 4
14व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हेजलवुडनं सूर्याची विकेट घेत भारताला धक्का दिला. धावांचा वेगही कमी होऊन दबावही वाढू लागला. कोहलीनं 37 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

14व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हेजलवुडनं सूर्याची विकेट घेत भारताला धक्का दिला. धावांचा वेगही कमी होऊन दबावही वाढू लागला. कोहलीनं 37 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.