Photos : सूर्या-कोहली अन् अक्षरची जोरदार कामगिरी, पाहा खास फोटो
मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात टीम इंडियानं शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्स राखून पराभव केला. या सामन्यात सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली चांगलाच फॉर्मात दिसला. वाचा...
1 / 4

भारत-ऑस्ट्रेलियाच्या टी-20 सीरिजच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात टीम इडियानं (Team India) सहा विकेट राखून विजय मिळवला आहे.
2 / 4

सामन्यात सूर्यकुमार यादवची आतषबाजी आणि विराट कोहलीची (Virat Kohli) थेट खेळीनं महत्त्वाची भूमिका बजावली. विश्वचषकापूर्वीचा हा जबरदस्त सामना क्रिकेटप्रेमींना पहायला मिळाला आणि टीम इंडियाचं चहुकडे कौतुक होऊ लागलं.
3 / 4

अक्षर पटेलनं मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच आपल्या वेगवान गोलंदाजीनं पुन्हा ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत आणलं. यामुळेच वेगवान सुरुवात करूनही ऑस्ट्रेलियन संघ 17 षटकांत केवळ 140 धावा करू शकला.
4 / 4

14व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हेजलवुडनं सूर्याची विकेट घेत भारताला धक्का दिला. धावांचा वेगही कमी होऊन दबावही वाढू लागला. कोहलीनं 37 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
Follow Us