Sachin Dhas | जिंकलंस आणि जिंकवलंस, बीडच्या सचिनने टीम इंडियाला फायनलमध्ये पोहचवलं

Sachin Dhas | टीम इंडियाची दक्षिण आफ्रिके विरुद्ध घसरगुंडी झाली होती. मात्र बीडच्या सचिन धस याच्या बॅटिंगसमोर दक्षिण आफ्रिका ठस झाली. सचिनने टीम इंडियाच्या विजयात मोठं योगदान दिलं.

| Updated on: Feb 06, 2024 | 10:14 PM
1 / 5
टीम इंडिया आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचली आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 2 विकेट्सने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेलं 245 धावांचं आव्हान हे 8 विकेट्स गमावून पूर्ण केलं. बीडचा सचिन धस हा टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला.

टीम इंडिया आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचली आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 2 विकेट्सने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने विजयासाठी दिलेलं 245 धावांचं आव्हान हे 8 विकेट्स गमावून पूर्ण केलं. बीडचा सचिन धस हा टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला.

2 / 5
सचिन धस याने टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक भूमिका बजावली. सचिनने 95 बॉलमध्ये 11 चौकार आणि 1 षटकारासह 96 धावा केल्या.

सचिन धस याने टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक भूमिका बजावली. सचिनने 95 बॉलमध्ये 11 चौकार आणि 1 षटकारासह 96 धावा केल्या.

3 / 5
सचिनने 47 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर सचिनने गिअर बदलत फटकेबाजी केली. मात्र दुर्देवाने सचिन शतकाजवळ पोहचून शतक करु शकला नाही. मात्र त्याच्या या खेळीने टीम इंडियाच्या बाजूने सामना झुकवला.

सचिनने 47 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. त्यानंतर सचिनने गिअर बदलत फटकेबाजी केली. मात्र दुर्देवाने सचिन शतकाजवळ पोहचून शतक करु शकला नाही. मात्र त्याच्या या खेळीने टीम इंडियाच्या बाजूने सामना झुकवला.

4 / 5
टीम इंडियाची 245 धावांचा पाठलाग करताना 4 बाद 32 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर कॅप्टन उदय सहारन आणि सचिन धस या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 171 धावांची विक्रमी भागीदारी करत टीम इंडियचा विजय निश्चित केला.

टीम इंडियाची 245 धावांचा पाठलाग करताना 4 बाद 32 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर कॅप्टन उदय सहारन आणि सचिन धस या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 171 धावांची विक्रमी भागीदारी करत टीम इंडियचा विजय निश्चित केला.

5 / 5
दरम्यान आता टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकण्यापासून दूर आहे.  सेमी फायनलमधील दुसरा सामना हा 8 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत टीम इंडिया विरुद्ध खेळेल. हा महाअंतिम सामना 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

दरम्यान आता टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकण्यापासून दूर आहे. सेमी फायनलमधील दुसरा सामना हा 8 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम फेरीत टीम इंडिया विरुद्ध खेळेल. हा महाअंतिम सामना 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे.