AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paper Anti Leak Bill Parliament : रस्त्यावरची लढाई संपली, आज मोदी सरकारची सर्वात मोठी परीक्षा; संसदेत काय घडणार?

nda government : धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आज संसदेच्या पावसाळी अधिवशेनाचा पहिला दिवस आहे. या अधिवेशनाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Paper Anti Leak Bill Parliament : रस्त्यावरची लढाई संपली, आज मोदी सरकारची सर्वात मोठी परीक्षा; संसदेत काय घडणार?
| Updated on: Jul 27, 2026 | 7:46 AM
Share

नीट पेपरफुटी प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आज सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येणार आहेत. नीट पेपरफुटीवरून सीजेपीने आंदोलन केल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यानंतर संसदेत सलग काही दिवस गदारोळ पाहायला मिळाला होता. त्यामुळे आज संसदेच्या कारभारावर सर्वांच्या नजरा असणार आहेत. त्यात आज सोमवारी सत्ताधारी संसदेत परीक्षा दुरुस्ती विधेयक सादर करणार आहे.

मोदी सरकारने सार्वजनिक परीक्षा कायदा आणखी मजबूत करण्यासाठी मंत्रिमंडळाने पेपरफुटी विरोधी विधेयकाला आधीच मंजुरी दिली आहे. हेच विधेयक आज सादर केले जाणार आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील सोमवारचं कामकाज सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाचे नेते पक्ष कार्यालयात चर्चा करतील. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी इन्फोसिसचे सह-संस्थापक नंदन नीलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय टास्क फोर्सची स्थापना केल्याची घोषणा केली. यावेळी टास्क फोर्स एनटीएसहित परीक्षा दुरुस्तीवरही चर्चा करणार आहे.

भविष्यातील पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठी सोमवारी लोकसभेत परीक्षा दुरुस्ती विधेयक सादर केले जाईल. हे विधेयक केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह सादर करतील. या विधेयकात पेपरफुटीविरोधात कठोर शिक्षेची तरतूद आहे. लोकसभेत जितेंद्र सिंह विधेयक सादर केल्यानंतर हे मंजुरीसाठी प्रस्ताव मांडतील. या विधेयकात अंमलबजावणीतील त्रुटी दूर करणे, न्यायिक सिस्टम तयार करणे, फौजदारी खटल्यांना गती देणे या मुद्द्यांचा समावेश आहे. या विधेयकात 2024 सालच्या फ्रेमवर्कमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव आहे . या विधेयकात राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांना या कायद्याअंतर्गत गुन्ह्याच्या खघटल्यांसाटी सत्र न्यायालयांना स्पेशल फास्ट ट्रॅक कोर्ट म्हणून नियुक्त करण्याचे अधिकार असतील.

संसदेत पावसाळी अधिवेशन 20 जुलै रोजी सुरू झालं होतं. तर हे अधिवेशन 13 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी कामकाज सुरू राहावे, यासाठी तयारी दर्शवली आहे. तसेच त्यांनी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीट पेपरफुटीवर अधिकृतरित्या भाष्य करावे, अशी विरोधकांची मागणी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवर भाष्य करावं, अशी मागणी काँग्रेसची असणार आहे.

Follow Us
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे आवाहन; ग्लोबल साऊथला नियम घडवणारे...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे आवाहन; ग्लोबल साऊथला नियम घडवणारे बनवण्यावर भर
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा