
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताची निराशाजनक कामगिरी राहिली आहे. फॉर्मात असलेले खेळाडूही साजेशी कामगिरी करू शकले नाहीत. एकीकडे, पराभवाचं मंथन सुरु असताना टीम इंडियाच्या पुढील मालिकेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

भारतीय संघाचा पुढचा दौरा वेस्ट इंडिजविरुद्ध आहे. 12 जुलैपासून सुरु होणाऱ्या मालिकेत टीम इंडिया 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी 20 सामने खेळणार आहे.

वेस्ट मालिकेपूर्वी माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी टीकास्त्र सोडलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील पराभव जिव्हारी लागला असून त्यांनी खेळाडूंच्या कामगिरीवर संताप व्यक्त केला आहे.

भारतीय संघ पुढच्या मालिकेत वेस्ट इंडिजला पराभूत करेल. कारण तो कमकुवत संघ आहे. तुम्ही त्यांना व्हाईट वॉश द्याल किंवा मालिका जिंकाल. पण कमकुवत संघांना पराभूत करून तुम्ही महान होत नाहीत.

टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सज्ज झाली आहे. ही मालिका टीम इंडिया नक्कीच जिंकेल, असं भाकीत गावसकर यांनी आधीच केलं आहे.

कमकुवत संघांना नाही तर बलाढ्य संघाला पराभूत संघ महान होतो, असंही सुनील गावस्कर यांनी पुढे सांगितलं.