
वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका भारताने 1-0 ने जिंकली. दुसऱ्या कसोटी मालिकेत कर्णधार रोहित शर्मा आणि विकेटकीपर इशान किशन यांनी जलद अर्धशतकं झळकावली.

रोहित शर्माने 35 चेंडूत, तर इशान किशननं 33 चेंडूत जलद अर्धशतक झळकावलं.

भारतासाठी कसोटीत सर्वात कमी चेंडूत अर्धशतक झळकावणारे फलंदाज कोण आहेत ते पाहूया...

2022 मध्ये ऋषभ पंतने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात केवळ 28 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते.

1982 मध्ये पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात कपिल देव यांनी अवघ्या 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.

शार्दुल ठाकूरने 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध 31 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.

2008 मध्ये इंग्लंडविरुद्ध सेहवागने अवघ्या 32 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात इशान किशनने अवघ्या 33 चेंडूत अर्धशतक पूर्ण करून या यादीत पाचव्या स्थानावर आहे.