
वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी टीम इंडिया सज्ज आहे. 8 ऑक्टोबरला भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये हा सामना होईल. या सामन्यातील विजेत्या संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

विराट कोहली याला रनमशिन या नावाने संबोधले जाते. आतापर्यंत क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. विराट कोहली याचा हा चौथा वनडे वर्ल्डकप असणार आहे. पण यापूर्वी खेळल्या गेलेल्या तीन वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीत नकोशी कामगिरी आहे.

विराट कोहली हा 2011, 2015 आणि 2019 या तीन वनडे वर्ल्डकपमध्ये खेळला. तिन्ही वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत त्याने फक्त 11 धावा केल्या आहेत. वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील हा त्याचा वाईट रेकॉर्ड आहे.

विराट कोहलीने 2011 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत फक्त 9 धावा केल्या होत्या. हा सामना पाकिस्तान विरुद्ध झाला होता. भारताने या सामन्यात 29 धावांनी विजय मिळवला होता. यचा सामन्यात सचिन तेंडुलकरने 85 धावांची खेळी केली होती.

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2015 मध्ये भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठली होती. सिडनी मैदानात ऑस्ट्रेलियाने 329 धावांचं लक्ष्य दिलं होतं. या सामन्यात भारताला 95 धावांनी पराभव सहन करावा लागाल. विराट कोहली फक्त 1 धाव करून तंबूत परतला होता.

2019 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत विराट कोहलीकडे नेतृत्व होतं. न्यूझीलंडकडून 18 धावांनी पराभव सहन करावा लागला. टीम इंडियाला 240 धावांचं लक्ष्य देण्यात आलं होतं. पण पावसामुळे हा सामना रिझर्व्ह डेपर्यंत पोहोचला. या सामन्यात केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी एक धाव करून तंबूत परतले होते.