
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या. टीम इंडियाने प्रत्युत्तरात 296 धावा केल्या. टीम इंडियाकडून अजिंक्य रहाणे याने 89 आणि शार्दुल ठाकुर याने 51 धावांची खेळी. या दोघांनी 109 धावांची भागीदारी केली. टीम इंडियाने या भागीदारीच्या जोरावर कमबॅक केलं.

टीम इंडियाचा ऑलराउंडर शार्दुल ठाकुर याने पहिल्या डावात 109 बॉलमध्ये 6 चौकारांच्या मदतीने 51 धावांची खेळी केली. शार्दुलचं ऑस्ट्रेलिया विरुद्धचं हे दुसरं अर्धशतक ठरलं.

शार्दुलने याआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2021 मध्ये गाबा टेस्टमध्ये 67 धावांची खेळी केली. शार्दुलने निर्णायक क्षणी अर्धशतक करत टीम इंडियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

शार्दुलने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकूण 9 कसोटी सामन्यांमध्ये 15 डावात 305 धावा केल्या आहेत.

तसेच शार्दुलचं ओव्हलमधील हे सलग तिसरं शतक ठरलं. याआधी पाहुण्या खेळाडूंमध्ये सर डॉन ब्रेडमॅन आणि एलेन बॉर्डर या दोघांनी ओव्हलमध्ये सलग 3 अर्धशतकं ठोकण्याची कामगिरी केली होती.