
दहावीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आता जल्लोष सुरु आहे. परंतु रायगडमधील उरणमध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या सार्थकने अनोखा जल्लोष केला. एखाद्या राजकीय नेत्याच्या विजयापेक्षाही मोठा जल्लोष करण्यात आला. त्याला 50 टक्के गुण मिळाल्यानंतर हा जल्लोष केला.

सार्थक दहावीला असताना मोबाईलमध्ये गुंग असायचा. तो अभ्यासच करत नव्हता. त्यामुळे त्याच्या मित्रांनी तू नापास होशील अशा पैजा लावल्या, मात्र सार्थकने आपण पास होणार असल्याचे सांगितले होते.

सार्थक मित्रांना आपण फक्त पासच होणार नाही तर फर्स्टक्लासने पास होणार असल्याचे सांगत होता. त्यानंतर २७ मे निकालाचा दिवस आला. त्यात सार्थक 50 टक्के गुण मिळवून पास झाला आणि आनंद सुरु झाला.

शंभर पैकी शंभर टक्के मिळवणारे विद्यार्थ्यांनी केला नसेल असा जल्लोष सार्थक आणि त्याच्या मित्रांनी केला. त्याला ५० टक्के मिळाल्यानंतर गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक जेसीबीवर बसवून निघाली.

सार्थकची चक्क ढोल ताशांच्या गजरात जेसीबीवरून मिरवणूक उरणमध्ये सुरु झाली. संपूर्ण गावात सार्थक चर्चेचा विषय बनला. त्याच्या मित्रांनी आनंद व्यक्त केला. गावकऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले.