
चाणक्यनितीनुसार, काही व्यक्तींचा सहवास हा एखाद्या विषारी सापासारखा असतो. आपण कोणासोबतही निस्वार्थपणे मैत्री करतो. पण काही वर्षे लोटल्यानंतर आपल्याला दगाफटका झाल्याचं जाणवतं. त्यामुळे चाणक्यनिती काही स्वभावाच्या लोकांपासून दूर राहण्यास सांगितलं गेलं आहे.

चाणक्यनितीत एक श्लोक आहे. या श्लोकात सदर व्यक्तीच्या स्वभावाबाबत स्पष्ट काय ते सांगितलं आहे. दुर्जनेषु च सर्पेषु वरं सर्पो न दुर्जन:| सर्पो दंशति कालेन दुर्जनस्तु पदे-पदे || या श्लोकात आचार्य चाणक्य यांनी सापाला कपटी माणसापेक्षा जास्त बरा असल्याचं सांगितलं आहे.

दुष्ट आणि साप यांच्यातील फरक पाहिला तर दोघांमध्ये साप श्रेष्ठ ठरतो. कारण साप एकदाच चावतो. पण दुष्ट व्यक्ती प्रत्येक पावलावर आपल्याला संकटात टाकते. तसेच चांगल्या कामात अडचणी आणते.

चाणक्य नीती

भविष्यात त्याच्या वागण्यात सुधारणा होईल असा भ्रमही तुमच्यासाठी मारक ठरेल. कारण अनेकदा आपण चुकांवर पांघरून घालून एकप्रकारे त्याचं समर्थन करतो. त्याला माफ करणं ही चूक ठरते. वाईट माणसांमध्ये कधीच बदल होत नाही. ते कोणत्या कोणत्या प्रकारे कायम त्रास देत असतात. अशा व्यक्तींपासून दूर राहणं चांगलं राहतं.